नवी दिल्ली-बहुजन समाज पक्षाला खिंडार पाडण्याला सुरवात झाली आहे. राज्यस्थान मध्ये बसपा च्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिट्टी देत काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर मायावती चांगल्याच संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या ट्विटर वरून काँग्रेस वर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसमुळे देशात जातीयवादी शक्ती वाढत असल्याचा आरोप मायावतींनी केला आहे.