जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीचा किल्ला लढवणाऱ्या उमेदवारांसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून तुमच्या लढण्यानं चळवळ जिवंत राहत असल्याचं म्हटलं आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकरांनी पुढे म्हटलं आहे की,५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांत वंचित बहुजन आघाडीचा सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या लढल्याने चळवळ जिवंत राहते. जे निवडून आले त्यांची जबाबदारी आता वाढली आहे, ती त्यांनी काटेकोरपणे पार पाडावी अशा सदिच्छा देखील दिल्या आहेत.
५ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांत वंचित बहुजन आघाडीचा किल्ला लढवणाऱ्या सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या लढल्याने चळवळ जिवंत राहते. जे निवडून आले त्यांची जबाबदारी आता वाढली आहे, ती त्यांनी काटेकोरपणे पार पाडावी हीच सदिच्छा.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 7, 2021
दरम्यान अकोला जिल्हा परिषदेत सर्वाधिक सहा जागा जिंकल्याने वंचित ने आपली ताकद दाखवून दिली आहे.यामुळे वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ला असणाऱ्या अकोल्यात १४ जागांवर पोटनिवडणूक झाली होती. त्यापैकी सहा जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेला एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजप, काँग्रेस व प्रहार संघटनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागले आहे. तसेच दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारत विजय मिळवला आहे.