नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये देशातील काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली हाेती; मात्र रुग्णसंख्येत पुन्हा घट हाेताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 28 हजार 591 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर काल 338 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.
गेल्या 24 तासात देशात 34 हजार 848 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 32 लाख 36 हजार 921 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 9 हजार 345 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 42 हजार 655 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 84 हजार 921 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 73 कोटी 82 लाख 7 हजार 378 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.