जळगाव (प्रतिनिधी) दि. 2 -आज 2 सप्टेंबर रोजी हतनुर धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर येऊन हतनूर धरणांमधून पाणी सोडावे लागणार आहे.
तरी तापी नदी काठावरील गावातील सर्व नागरिकांना व सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क रहावे.नदीच्या काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये तसेच आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात उतरवू नयेत. जिवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांना सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगांव यांनी केले आहे.