भुसावळ – स्वातंत्र्याची लढाई ही सर्व ओबीसी बांधवांनी लढल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपविण्याचा घाट सुरु आहे. हे कदापी आम्ही होऊ देणार नाही, असे परखड मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्यासह भुसावळ येथील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडले.
भुसावळ येथे माळी भवनमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ‘ओबीसी राजकीय आरक्षण पे चर्चा’ या बैठकीचे आयोजन आज शनिवार दि. 17 रोजी दुपारी 12 वा. करण्यात आले होते.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक नाळे, निरीक्षक आशिष शेलार, सर्वोच्च न्यायालयाचे वकील ऍड. प्रतिक कर्डक, महात्मा फुले समता परिषदेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, राष्ट्रवादीचे प्रा. डॉ.सुनील नेवे सर, शिवसेनेचे दीपक धांडे, शहरप्रमुख बबलू बराटे, भाजपचे शिशिर जावळे, झेंडूजी महाराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिनेश भंगाळे उपस्थित होते. प्रास्ताविक महात्मा फुले समता परिषदचे तालुकाध्यक्ष संतोष माळी यांनी केले.
प्रा.डॉ. नेवे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी उदासीनता झटकून एकत्र येऊन ओबीसी राजकीय आरक्षणात सहकार्य केले पाहिजे तसेच उपलब्ध इंपेरिकल डेटा वर काम करून ओबीसी समाजास त्वरित न्याय दिला पाहिजे असे मत राष्ट्रवादी कँग्रेस पार्टीचे प्रा.सुनील नेवे यांनी मांडले. भाजपचे शिशिर जावळे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाच्या सर्वागिण विकासासाठी, न्याय हक्कासाठी सर्व पक्ष, सामाजिक संघटना यांनी आपले हेवेदावे, वैचारिक मतभेद विसरून एकत्र यावे. व ओबीसी समाजाला आता खऱ्या अर्थाने जागवायचीव जगवायची वेळ येऊन ठेपली असून ओबीसी आरक्षण संदर्भातील चळवळ अधिक प्रगल्भ करावी असे शिशिर जावळे यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी सांगितले की, ओबीसी समाजाचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणू पाहणाऱ्या प्रवृत्तीना शिवसेना स्टाइल उत्तर देऊन आरक्षण मिळणारच असल्याचे शिवसेनेचे युवा नेते माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी याप्रसंगी मनोगतातून सांगितलं.
ओबीसी आरक्षणात विलंब होण्यासाठी तसेच ओबीसीचे राजकीय नेतृत्व संपविणारे कितीही विद्वान पंडित अडथळे आणो.. आमच्या अंगावर आल्यास शिंगावर घेऊ.. असा इशाराही संत झेंडुजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार युवक मंडळ भुसावळचे अध्यक्ष दिनेश भंगाळे यांनी दिला.अखिल भारतीय लेवा पाटीदारयुवा विकास महासंघ विद्यार्थी संघटना चे जळगाव जिल्हा अध्यक्ष एडवोकेट सागर सरोदे यांनी याप्रसंगी ओबीसी समाजाच्या हितासाठीच्या, न्याय हक्कासाठी च्या प्रत्येक लढाईमध्ये आंदोलनाना जाहीर पाठिंबा देत असल्याच जाहीर केले.
या कार्यक्रमाला ऍड. सागर सरोदे, वसंतराव कोलते, एसटी महामंडळ चे धर्मराज देवकर, किशोर पाटील, सचिन बराटे, गिरीश पाटील, सागर वाघोदे, संजय बऱ्हाटे,महालक्ष्मी ग्रुप भुसावळचे सर्व पदाधिकारी तसेच कैलास बंड, माळी महासंघाचे भुसावळ तालुका अध्यक्ष विजय माळी, वरणगाव शहर अध्यक्ष सचिन माळी, गजानन माळी, सुधाकर माळी, देवेंद्र वराडे, चंद्रशेखर पाटिल,आदी उपस्थित होते. आभार प्राचार्य धीरज पाटील सर यांनी मानले.