मुंबई, राज्यपालनियुक्त १२ आमदारांवर अद्याप पर्यंत निर्णय का घेतला नाही याबाबत अखेर स्पष्टता द्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहेत. ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे शिफारसीद्वारे १२ नावे पाठविण्यात आली होती त्यावर राज्यपालांनी हो किंवा नाही असा निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं आहे.
न्या. काठावाला आणि न्या. तावडे यांच्या खंडपीठापुढे यासंबंधीच्या दाखल याचिकेवर सुनावणी झाली. याप्रकारणी सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी ही याचिका दाखल केली असून वकील गौरव श्रीवास्तव यांनी त्यांची बाजू मांडली.