- आमदार किशोर पाटील यांचा माजी आमदार दिलीप वाघांना सबुरीचा सल्ला
पाचोरा:- विकासाच्या विधायक कामांना विरोध करण्याची परंपरा माजी आमदार दिलीप वाघ यांनी सोडून द्यावी. अकारण ऊठसूट नकार घंटा वाजवण्यापेक्षा मंजूर झालेल्या कामाचे पुरावे असलेले शासकीय राजपत्र एक वेळ वाचून घ्यावे.असा सल्ला आमदार किशोरअप्पा पाटील यांनी आज दि.18 रोजी पत्रकार परिषद प्रसंगी बोलतांना दिला.
पत्रकार परिषदेत बोलतांना पुढे आ.किशोरअप्पा पाटील म्हणाले की, मागील साडेचार वर्षाच्या कालावधीत मतदारसंघात मी विधानसभा सदस्य या नात्याने आतापर्यंत साडेसहाशे कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण केली आहेत यानंतरही वर्षभरापूर्वी घोषित केल्या प्रमाणे भडगाव येथील एमआयडीसी प्रकल्प शासनाने मंजूर केला आहे यासाठी केलेला सततचा पाठपुरावा राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीचे मान्यता अहवाल उपलब्ध असताना माजी आमदार मात्र विरोधाभासी वल्गना करत आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत एमआयडीसी मंजूर नसल्याचा केलेला दावा हास्यास्पद असून त्यांचा जनाधार कमी झाल्यानेच दिलीीप वाघ निराशेमुळे निराधार आरोप करीत आहे असाा टोला आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लगावला .भडगाव येथील एमआयडीसी प्रकल्प मंजुरीच्या विषयावरून राका माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदारांची घोषणा फसवी असल्याचे सांगितले होते या वृत्ताचा समाचार आमदार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत घेतला.बहुळा धरणाची निर्मिती होत असताना याच वाघ परिवाराने शिंगाडे हातात घेऊन या महत्त्वपूर्ण विकास कामाला विरोधाचा पवित्रा घेतलााा होता आणि तेच माजी आमदार त्यांच्या कार्यकाळात पासून प्रलंबित असलेल्या बहुला उतावळी नदीजोड प्रकल्पाविषयी विचारणा करत आहे. क्रीडा संकुलाची निर्धारित जागा हडपण्यासाठी कोर्टात दावा करणाऱ्या दिलीप वाघांनी या या कामांच्या बाबतीत विचारणा करताना नैतिकता दाखवावी. मतदारसंघात मध्ये महत्वपूर्ण विकास प्रकल्प आकारास येत असताना माजी आमदारांनी मोठेपणा दाखवून माझे अभिनंदन करणे अपेक्षित होते मात्र त्याऐवजी स्वतःचे अपयश जगण्याच्या नादात मी केलेली विकास कामे फसवी असल्याची हास्यास्पद भूमिका माजी आमदार घेत आहेत अशी सडेतोड टीका आमदार पाटील यांनी यावेळी केली.भडगाव एम आय डीसी मंजुरी बाबत चा शासकीय आदेश पुरावा म्हणून आमदार किशोर पाटील यांनी शिवतीथॅ येथे पत्रकार परिषदेत दिला यावेळी त्यांच्यासमवेत नगराध्यक्ष संजय गोहिल उद्योजक मुकुंद बिल्डीकर शिवसेना जिल्हा उपप्रमुख ॲड दिनकर देवरे गणेश पाटील जि प सदस्य पदमसिंग पाटील उपस्थित होते. मतदारसंघातील विकास कामाची जाणीव असल्याने सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे खेचून आणतो त्यामुळे मतदारसंघात विकासाचा झंझावात सुरू आहे . मात्र विधानसभा निवडणूक जवळ आल्याने प्रकाश झोतात राहण्यासाठी माजी आमदार स्टंट बाजी करत आहे. उतावळीच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या मिटींगमध्ये १८कोटी मंजुर केले असून आगामी वर्षभरात उतावळीचे काम पूर्ण होईल. त्याचप्रमाणे आद्योगीक वसाहत पूर्णपणे अस्तित्वात येण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे दिलीप भाऊंनी याविषयी कुठलीही चिंता न करता सकारात्मक विचार करावा अशी कोपरखळी आमदार किशोर पाटील यांनी यावेळी मारली