“देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड जास्त गरज” असे तत्वज्ञान पाजळणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हे ज्ञानामृत या भयानक परिस्थितीत सरकारी तिजोरीतून ४०० कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावे असा टोला कांदिवली (ईस्ट) विधानसभा मतदार संघांचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदर डॉ. अमोल कोल्हे यांना लागवला आहे.
काय म्हटले होते खा. अमोल कोल्हे
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी भासत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर व आरोग्य सुविधेचा अभाव यावर भाष्य करत ट्विट करून मोदींवर टीका करत म्हटलं होतं की,
आता तरी पटतंय ना ?
ज्या देशाच्या आरोग्यव्यवस्थेच्या मर्यादा कोरोनामुळे उघड्या पडल्या तिथं काय पाहिजे?
नवं संसदभवन की सुसज्ज हॉस्पीटल ?
आंधळी भक्ती आणि व्यक्तीपूजेपेक्षा देशातील नागरिकांचे आरोग्य आणि हित सर्वाधिक महत्वाचं आहे.