मुंबई, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात कोरोनाचे ‘डबल म्युटेशन झाले असताना त्या संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी राज्याने केंद्राशी पत्रव्यवहार केला असून अगदी स्वॅबचे नमुने देखील पाठवले तरी अद्याप कोणताच प्रतिसाद केंद्राने दिलेला नाही असा गंभीर आरोप करित मोदी सरकारला लोकांच्या जीवापेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे हेच यावरून दिसत असल्याचं महाराष्ट्र काँग्रेस ने ट्विट करून म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाच्या ६० हजाराच्या जवळपास नव्या रुग्णांची नोंद झाली असून तसेच अनेकांचा जीव गेला आहे.राज्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असल्याच्या कारनामध्ये ‘डबल म्यूटेशन’ कोरोना कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जिनोम विश्लषेणासाठी पाठविण्यात आलेल्या ३६१ नमुन्यांपैकी ६१ टक्के नमुने हे ‘डबल म्यूटेशन’ झालेल्या कोरोना विषाणूचे होते, अशी महिती समोर आली आहे. राज्यात संक्रमण ‘डबल म्यूटेशन’ कोरोना व्हायरसचे होत असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असा दावा जिनोम विश्लेषक तज्ज्ञाने केला आहे.
डबल म्यूटेशन म्हणजे नेमकं काय ?
म्युटेशन म्हणजे विषाणूच्या रचनेत म्हणजे गुणसुत्रांत काही प्रमाणात बदल होणं, लाखो लोकांच्या शरीरातून दुसऱ्यांच्या शरीरात विषाणू पसरत असतो, तेव्हा असे बदल घडतात. अशा बदल झालेल्या विषाणूंना नवीन स्ट्रेन्स किंवा डबल म्यूटेशन म्हणतात.