तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेले असतांना आज राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे ज्या दिवशी सचिन वाझे हे गृहमंत्री देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा केला परमवीर सिहं यांनी केला आहे त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत असून विलगीकरणात होते. त्यावेळी देशमुख यांची तब्बेत बरी नव्हती.
इतके दिवस परमवीर सिंह हे गप्प का होते असा प्रश्न देखील पवार यांनी उपस्थित केला आहे.मनसुख हिरेन प्रकरणाला भरकटविण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु असून तपास यंत्रनेच्या चौकशीत सत्य सोमोर येईल, ATS च्या तपासावर पूर्ण विश्वास असल्याचं खा. शरद पवार यांनी वेळी सांगितलं आहे.
गृहमंत्री यांच्या राजीनाम्याचा प्रश्नचं येत नाही
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा बाबत विचारलं असता राजीनाम्या चा विषयच येत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.















