जामनेर,(प्रतिनिधी) – जिल्ह्यासह जामनेर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणू संक्रमण वाढत चालल्याने जामनेर शहरात मंगळवार दिनांक 16 मार्च पासून तर शुक्रवार 19 मार्च पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असल्याचं तहसीलदार अरुण शेवाळे यांनी ‘नजरकैद’ शी बोलतांना सांगितले.
कोरोना संसर्ग रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे .याच अनुषंगाने जामनेर शहरात माजी मंत्री आमदार गिरीश महाजन , तहसीलदार अरुण शेवाळे , न.पा.मुख्यअधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत झालेल्या निर्णया नुसार ४ दिवसांचा ‘ जनता कर्फ्यू ‘ जाहीर करण्यात आला आहे.
या कालावधीत अत्यावश्यक सेवांमध्ये दवाखाने ,मेडिकल , दुध डेअरी सुरु राहणार आहे .
दूध डेअरी सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत सुरु राहणार आहे .तर
सर्व भाजीपाला विक्री , फळांची दुकाने , हॉटेल्स , थंडपेयांची दुकाने , सर्व प्रकारचे जनरल स्टोअर्स , किराणा दुकान ,ज्वेलर्स , कापड दुकाने , सलून दुकाने , मटन शॉप आदी सर्व प्रकारची दुकाने बंद राहणार आहेत याची जनतेने नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .
‘जनता कर्फ्यू ‘मध्ये सर्व जामनेर कर यांनी स्वतःहून सहभागी व्हावे आणि कोरोना विषाणूची सामाजिक साखळी खंडित होण्यासाठी महत्त्वाचे योगदान द्यावे ,असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .















