जळगाव, (प्रतिनिधी)- कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासन माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीचा अर्जावर विचार न करता वकील असलेल्या कुणाल पवार यांना वारंवार अर्ज करूनही माहिती देत नसल्याने विद्यापीठात ‘माहिती अधिकाराला केराची टोपली दाखवली जातं असल्याचं कुणाल पवार यांनी म्हटलं आहे.
याबाबत कुणाल पवार यांनी विद्यपीठाचे कुलसचिव यांना दिनांक 26 डिसेंबर रोजी पत्र देऊन कळविले आहे की, मी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वय अर्ज करुन विविध माहिती मागितली आहे मात्र आजपर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून माहिती देण्यास तत्परता दाखवलेली नाही तरी मी मूळ अर्जांन्वय मागितलेली माहिती मला तात्काळ मिळण्यासाठी कार्यवाही व्हावी अशी मागणी केल्यानंतर कुलसचिव यांनी माहिती देण्यासाठी आदेशित न करता जनमाहिती अधिकारी यांची मिटिंग लावण्याचे मागणी अर्जावर नोंद करुन वेळ मारून नेली आहे.
माहितीच्या अधिकारात अर्ज आल्यानंतर जनमाहिती अधिकारी यांनी 30 दिवसाच्या आत अर्जदार यांना उपलब्ध माहित पुरविणे बंधनकारक असतांना कधी अर्जांना मुदतीत निकाली न काढणे,अपूर्ण माहिती देणे अशा पद्धतीने सर्व नियमांना ‘केराची टोपली’ दाखवली जातं असल्याचा आरोप वकील कुणाल पवार यांनी केला आहे.