जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीत 220 चे उद्दीष्ट्टपूर्ती करण्याकरिता मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची अग्निपरीक्षाच असल्याचे बोललेले जात आहे.पक्षाच्या निष्ठावंतांसोबत पक्षात नव्याने आलेल्यांचा सुद्धा विचार करावा लागणार आहे.काहींना डच्चू तर काहींना संधी देतांना बंडखोरी रोखणे हे सगळे करतांना अग्निपरीक्षेतुन जावेच लागेल हे मात्र खरे असले तरी ही अग्नीपरीक्षा ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या साथीने मुख्यमंत्र्यांना सुलभ होणार
लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीला धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीत भाजपने २२० जागा असे लक्ष ठेवले असून त्यांच्या नेत्यांनी यादृष्टीने मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजप काही जागेंवर विशेष लक्ष केंद्रित करून त्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अग्निपरीक्षा असणार आहे. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना फार मोठा धोका पत्करावा लागणार आहे. सध्या राजकीय वर्तुळात याच धोक्याची चर्चा सुरु आहे.
भाजपने माजी महसूलमंत्री आ. एकनाथ खडसे यांना सोयीस्कर पणे मंत्रिमंडळापासून दूर ठेवले आहे.अखेरच्या पावसाळी अधिवेशनात नाथाभाऊंनी आपल्याच सरकारला जाब विचारत घरचा आहेर दिल्याने पुन्हा एकदा आ.खडसेंची नाराजी जाहीर दिसून आली. तसेच आ.खडसे आणि मुख्यमंत्र्यांच्या संबंधांमध्ये कटुता आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांचे तिकीट मुख्यमंत्री कापणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु भाजपच्या एवढ्या मोठ्या मातब्बर नेत्याचे तिकीट कापण्याची जोखीम भाजपा घेईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नाथाभाऊंचे तिकीट कापण्याचे धाडस कदाचित पक्षाने केलेस तर त्याचे परिणाम खान्देशच्या राजकारणावर होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे.