भुसावळ, (धम्मरत्न गणवीर ) -राज्यातील लाखो वीजग्राहक हे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग आहेत व त्यांना ऑनलाईन विजबिल भरता येत नाहीत .यामुळे विजबिल भरणा केंद्र सुरू करण्यात यावे .अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसि वर्कर्स फेडरेशन च्या वतीने करण्यात आली आहे .राज्य सरकारच्या कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करत राज्यातील बँका सुरू आहेत.त्याच पद्धतीने खाजगी विजबिल भरणा केंद्र स्विकारणे सुरु करून शहरी ग्रामीण व शेतकरी मजुरांची विजबिल भरणासाठी होणारी अडचणी दूर करता येतील .