वरणगाव, (अंकुश गायकवाड):- फुलगांव तालुका भुसावळ येथे महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे . या कामगारांना हाताला काम नाही व ठेकेदाराकडून ठेकेदारांकडून कमी पैसे मिळत असून काम ठप्प झाले आहे याकरिता घराकडे जाऊ द्या अशा प्रकारची मागणी परप्रांतीय मजुरांनी केल्याने जमाव संतप्त झाला व सुपरवायझर व अभियंता यांना मागणी होऊ लागल्याने सुपरवायझर व अभियंत्यांनी काढता पाय घेतला पोलिसांनी समजावल्यानंतर जमाव शांत झाला.
राष्ट्रीय महामार्गाचे चिखली ते जळगाव पर्यंत काम सुरू आहे या कामावर मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश व झाडखंड येथील किमान ३५० कामगार आहेत . मात्र देशभरात कोरोना या संसर्ग आजारांमुळे लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे . याचा फटका या परप्रांतीय कामगारानांही बसला असुन महीनाभरापासुन हे कामगार रिकामे बसले आहेत . यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली असुन त्यांना गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे . मात्र, कंपनीचे अधिकारी त्यांना याबाबत सहकार्य करीत नसल्याने सोमवारी कामगारांच्या भावनांचा उद्रेक झाला. यावेळी संतप्त झालेल्या कामगारांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करुन गोंधळ निर्माण केला . याची वरणगांव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवुन कामगारांची समजुत घातली . रितसर शासनाची परवानगी घेऊन पासेस काढूनच आपण आपल्या गावाकडे जावु शकतात यासाठी प्रक्रिया असून त्या द्वारे आपण पास करू शकतात व गावाकडे जाऊ शकतात असा गोंधळ घालून गावाकडे जाता येणार नाही यानंतर जमाव शांत झाला असून गावाकडे जाण्याची ओढ लागलेली आहे
सध्या पुलगाव ते तरसोद 32 किलोमीटरचे काम कंपनीच्या वतीने सुरू असून यासाठी शासनाकडून परवानगी देखील मिळाली आहे लॉक डाउन नंतर काही मजूर पायी घराकडे येऊन गेले परंतु आता सध्या पाचशे मजूर व दीडशे कार्यालयात काम करणारे कर्मचारी आहेत रस्त्याचे काम सुरू असून मजुरांना काम मिळणार आहे परंतु दोन-तीन दिवसापासून मजुरांना घराकडे जाण्याची ओढ लागलेली आहे
दिड किलोमिटरचा उड्डाणपूल मे महिन्यापर्यंत होणे अपेक्षित
महामार्ग तयार होताना दीड किलोमीटर पर्यंतचा सर्वात मोठा उड्डाणपूल फुलगाव तालुका भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात जाणाऱ्या रेल्वे लाईन वरती आहे हा पूल मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु लॉक डाऊन मुळे बाहेरून आवश्यक साहित्य येत नसल्याने काम खोळंबले आहे
याबाबत राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी सुजान सिंह गौतम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हे काम चार-पाच कंत्राटदाराला दिले आहे संबंधित मजुरांना ठेकेदार पेमेंट देत नसतील तर त्याची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे परंतु सर्व मजूर घरी जाण्याची ओढ लागल्याने आम्हाला घरी सोडा असे म्हणत आहेत परंतु ते आमच्या अखत्यारीत येत नसल्यामुळे अडचणी आहेत वरिष्ठांशी बोलून हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.
दोन महिन्यापासून पगार नाही
लॉक डाऊन मुळे महामार्गाचे काम रखडले आहे कंत्राटदाराकडून पाचशे ते सातशे रुपयांची मदत होते तसेच कंत्राटदाराला कंपनीकडून पैसे मिळत नसल्याने अडचणी आहेत आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या असे येथील महामार्ग प्राधिकरणावर मजुरांनी केली आहे