जळगाव, प्रतिनिधी – रावेर तालुक्यात गारबर्डी धरण क्षेत्रात अडकलेल्या ‘ त्या’ नऊ युवकांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे.प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने हे बचावकार्य यशस्वी झाले.
सद्यस्थितीत जिल्हयात कुठल्याही जलाशयात किंवा नदी, नाले या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन करणेत येत आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी हजेरी लावली आहे, त्यामुळे अनेक छोटे मोठे प्रकल्प भरले आहेत. दरम्यान, पाल येथील सुखी गारबर्डी धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याचे धक्कादायक वृत्त समोर आल्या नंतर स्थानिक कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिली आहे. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. जर पाण्याचा प्रवाह अजून वाढला तर हे सर्व जण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्यासाठी तात्काळ संबंधित यंत्रणेला कळविण्याची विनंती पाटबंधारे विभागाचे सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी आपत्ती व्यवस्थापनाला केली होती.
याबाबतची माहिती मिळताच प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी आवश्यक साहित्य व मनुष्यबळासह घटनास्थळी धाव घेतली आहे. धुळे येथील SDRF चे पथक बचावकार्यासाठी मागविण्यासाठी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात कळविण्यात आले होते अखेर त्या अडकलेल्या ९ युवकांना सुखरूप काढण्यात आले.
रावेर तालुक्यात गारबर्डी धरण क्षेत्रात अडकलेल्या 9 युवकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने हे बचावकार्य यशस्वी झाले.
सद्यस्थितीत जिल्हयात कुठल्याही जलाशयात किंवा नदी, नाले या ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन करणेत येत आहे. pic.twitter.com/cpgxivQfm9— Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव (@JalgaonDM) July 18, 2022