दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने १३ डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला असून यामुळे राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.आधीच राज्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले असतांना अजून अवकाळी पावसाचा मुक्काम वाढल्यास शेतकरी मोठ्या अडचणीत येईल.
दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली होती डिसेंबर सुरु झाला पाऊस अद्याप माघारी जायला तयार नाही. सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत असल्याने पावसाला अनुकूल वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे.राज्यात झालेला अवकाळी आणि गारपिटीमुळे २२ जिल्ह्यांतील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले अवकाळी पावसाचे संकट अजूनही कायम आहे. राज्यात १ आणि २ डिसेंबर रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे तर कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे. १ डिसेंबर रोजी अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि अकोला जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश भागासह जळगावला पावसाचा यलो अलर्ट असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा.….
गुन्ह्यात नसतांना FIR मध्ये नाव घातले तर त्यावर प्रतिउत्तर कलम काय?
कोणत्या ५ सवयी माझे आयुष्य उध्वस्त करू शकतात?
अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
पुढील 5 दिवसांसाठी हवामान विभागाने वर्तविलेला हवामानाचा अंदाज pic.twitter.com/jBawR7cq5D
— Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव (@JalgaonDM) December 1, 2023