जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध शासनाने कठोर कारवाई असे निवेदन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी सोबत मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, दि. १६ मार्च २०२३ रोजी दिक्षित वाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुर्णाकृती पुतळा स्थलांतरीत करण्याबाबत झालेल्या छोट्या वादाचे आपल्या राजकीय फायद्याकरीता जळगांव चे नांव विधिमंडळाच्या पवित्र सभागृहामध्ये महाराष्ट्राचे स्वयंघोषीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार श्री एकनाथराव खडसे यांनी बदनाम करण्याचे काम केले. वास्तविक पुतळा उठवल्यानंतर त्याच जागी शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे व सामाजिक संघटना तसेच पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत पुतळा विधीवत पुजा करून बसविण्यात आला. शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली नसतांना जिल्ह्यामध्ये सामाजिक सद्भावना समरसता ही कायम राहीली.
दलित बांधवांनी कुठेही गालबोट लागेल असे कृत्य केल्याचे पोलीस नोंद मध्ये आढळून येत नाही. परंतु मा. श्री एकनाथराव खडसे यांनी विधीमंडळाच्या हाऊस मध्ये जळगांव जिल्ह्याचे वरील प्रकरणी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रात जळगांव जिल्ह्याचे नांव मलीन झाल्याचे दिसुन येते व मागील हेतुने जिह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात वातावरण खराब केल्याचे दिसुन येत आहे. त्यांच्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ह्या पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.