पिंपळनेर – राज्याचे माजी आदिवासी विकास कल्याण मंत्री अॅड.गोविंदराव शिवराम चौधरी यांचे वयाच्या ८२ वर्षी निधन झाले. आदिवासी समाजाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांनी इयत्ता सातवी पर्यंतचे शिक्षक कुकरमुंडा (जि. तापी) येथे घेतले. त्यानंतर दहावी पदवीपर्यंतचे शिक्षण पिंपळनेर येथे घेतले. तर पदवीपर्यंतचे शिक्षक धुळे येथे जयहिंंद हायस्कूलमध्ये घेतले. त्यानंतर मुंबई येथे एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले. मातीशी नातं घट्ट असल्याने समाजाचे काहीतरी देणं लागतो, याची उर्मी मनात कायम होती. काही काळ वकीली व्यवसाय करून ते राजकारणात आले.
गावपातळीवर स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक लढवली. नंतर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण व अर्थ विभागाचे सभापती झाले. विविध योजनांना लाभ त्यांनी थेट लाभार्थ्यांना दिला. त्यानंतर ते जनता पक्षाचे सदस्य झाले.
साक्री विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयी होऊन १९८७ साली पहिल्यांदा विधानसभेत गेले. भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधीत्व करीत विधानसभेत गेले. निवडणुकीत विजयी होऊन आमदार झाले. भाजपा-सेना युतीच्या काळात त्यांना आदिवासी विकास मंत्री म्हणून संधी मिळाली. नंतर त्यांनी मंत्रीपद ही सांभाळले. मंत्री पदावर असतांना विविध योजना आदिवासी समाज उत्थानासाठी त्यांनी आदिवासी शेतकरी, तरुण, महिला व सुशिक्षित बेकार तरूणांपर्यत एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग व उपयोजनेच्या माध्यमातून पोहचविल्या. अॅड. चौधरी यांनी देशातील पहिली १०० टक्के आदिवासी सभासद असलेली सहकार तत्वावरील सूतगिरणी प्रकल्प सन १९९७ मध्ये सुरू केला. कै.गोविंदराव चौधरी हेच संस्थापक चेअरमन म्हणून आजपर्यंत काम पाहत होते.
स्व. गोविंदराव चौधरी यांच्यावर उद्या शनिवार दि. २३ रोजी धोंगडे दिगर येथे मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा उदय, पाच मुली जावाई, नातू व भाऊ असा परिवार आहे.














