नवी दिल्ली : उझबेकिस्तानमध्ये कथितरित्या भारतीय कफ सिरपच्या सेवनानंतर 19 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं भारतीय कफ सिरपच्या वापराबाबत इशारा दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं बुधवारी (11 जानेवारी) उझबेकिस्तानमधील मुलांसाठी दोन भारतीय कफ सिरप – एम्ब्रोनोल सिरप आणि डॉक-1 मॅक्स सिरप – वापरू नयेत, अशी शिफारस केली आहे. मॅरियन बायोटेकद्वारे उत्पादित कफ सिरप ही गुणवत्ता मानकांची पूर्तता न करणारी उत्पादने असल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. प्रयोगशाळेच्या विश्लेषणात दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकॉल किंवा इथिलीन ग्लायकोल हे दोन्ही घातक पदार्थ आढळून आले आहेत.
हे पण वाचा..
राज्यातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदे भरणार
जळगावमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून बजाज फायन्सास कार्यालयाची तोडफोड
अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारने दिली खूशखबर! जाणून घ्या कोणाला मिळणार 5000 रुपयांचे कर्ज
उझबेकिस्तानमधील 19 मुलांचा मृत्यू भारतीय कफ सिरपमुळेच झाल्याचा दावा वारंवार केला जात आहे. आता भारत सरकारनंही याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या सूत्रांनी सांगितले होते की, हे सिरप सध्या भारतीय बाजारात विकलं जात नाहीये.