जळगाव । चार महिन्यांपूर्वी शिवसेनेसोबत व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह गुवाहाटी गाठले. त्यांच्या या बंडखोरीबद्दल शिंदे गटाच्या नेत्यांनी आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचे म्हंटले होते. मात्र, सत्तातरांच्या वेळी नेमक काय झालं ?, याबाबत आता शिंदे गटाचे नेते,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिलं होतं. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती”,असे गुलाबराव पाटील म्हणाले.
हे पण वाचा..
Jalgaon news : धक्कादायक ; बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीनं दिला बाळाला जन्म, गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील ‘या’ गावात आजही चक्क ‘पोर्तुगीज’ भाषा बोलली जाते…
राहुल गांधींच्या सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना घडला खूप विचित्र प्रकार
पेरू खाण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क..! काय आहेत जाणून घ्या
“उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता”, असे ते म्हणाले.जळगाव येथील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं”, असं देखील गुलाबराव म्हणाले. “असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो”, असंदेखील विधान त्यांनी केलं.