जळगाव,(प्रतिनिधी) – मी जामनेर येथील एका कार्यक्रमात बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी भाषण करित होतो… गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील, जिल्ह्यातील व मुक्ताईनगर तालुक्यातील बंजारा समाजाची लोकं माझ्यासोबत असून मी देखील त्यांच्या सोबत आहे आणि यापुढे देखील राहील मात्र माझ्या भाषणातील काही शब्दांचा विपर्यास करण्यात आला आणि त्यामुळे ते चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेले म्हणून बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून मी ते शब्द मागे घेत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे.(MLA Eknath Khadse)
दरम्यान एकनाथराव खडसेंनी जाहीर माफी मागावी अशा गोर सेनेची मागणीचे निवेदन मुक्ताईनगर तहसीलदारांना दिले दिले होते.निवेदनात म्हटले होते की,राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री MLA Eknath Khadse यांनी जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बंजारा समाजाबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केले. खडसेंनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मुक्ताईनगर येथील गोर सेनाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात येतं आहे.. MLA Eknath Khadseयांनी बंजारा समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी समाज बांधवांनी केली होती.अखेर ‘ ते’ शब्द मागे घेतो असं MLA Eknath Khadseयांनी एका व्हिडीओ द्वारे समाजमाध्यमावर सांगितले असून या वादावार पडदा पडण्याची शक्यता आहे.