- भाजपाकडून स्थानिक प्रश्न ,समस्यां दुर्लक्षित
- शहरातील खाड्यांमुळे शेकडो निष्पाप जीव गेले

जळगाव ;- आपणास संधी दिल्यास जनतेचा सेवक म्हणून काम करून दाखवेल,तसेच शहरवासीयांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी आपण कायम संपर्कात राहुन प्रश्न मार्गी लावू,आपल्याकडे जळगाव शहराच्या विकासासाठी नवीन व्हिजन असून यानुसार काम करून शहराचा कायापालट करून दाखवू, अशी साद महाआघाडीच्या उमेदवार अभिषेक पाटील यांनी जळगावकरांना घातली .
जळगावात ३७० च्या मुद्यावर भाषण झाले परंतू जळगावकरांच्या समस्यांवर भाजप काहीही बोलत नाही. जळगावकरांना विकास हवा आहे देशाची निवडणुक ३७० च्या मुद्यावर झाली आता या निवडणुकीत पुन्हा तोच मुद्दा पुढे केला गेला. जळगावकरांना विकास हवा आहे. २०१४ ला दिलेले आश्वासने आणि मनपा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची खैरात भाजपाने पुर्ण केलेली नाही. ही जनता विसरलेली नाही. म्हणून महाआघाडीच्या पाठीशी जनता उभी राहील असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे महानगरजिल्हाध्यक्ष तथा महाआघाडीचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांनी सांगितले..
राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे जळगाव शहरातील उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचाराला युवावर्गाची प्रचंड साथ मिळत असून त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान आज अभिषेक पाटलांचा विविध भागात प्रचार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी नागरिकांसह तरूणांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. युतीच्या आमदाराने जळगाव शहराचे प्रश्न सोडविण्यास फारसे प्रयत्न न केल्याने जळगाव शहर विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. रस्त्यांच्या समस्या कायम असून दर्जेदार सुविधादेखील मिळत नाहीत, त्यामुळे शहराचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी प्रचार रॅलीप्रसंगी केले.















