मुंबई । शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्रेतील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी)आज सकाळी धाड टाकली आहे. मनी लॉडिंग प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत ही कारवाई केली असून याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ईडीची कारवाई सुरु, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब आता कपड्यांची बॅग तयार ठेवावी,” असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळताच किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हंटले हे की, अनिल परब यांनी २०-२१ मध्ये दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधले. त्यानंतर रिसॉर्टच्या चौकशीनंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली कोर्टात फौजदारी खटला दाखल केला. अनिल परब यांनी शेकडो कोटींचे गैरव्यवहार केला आहे. आयकर विभागाचे छापे पडले तेव्हा अनिल परब यांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरात साडेतीन कोटी रुपये रोख सापडले.
अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात आहेत, आता अनिल परबनी तयार राहावे pic.twitter.com/bIMek2Etew
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 26, 2022
अनिल परब यांच्यावर अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणी जो फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला आहे तो भारत सरकारने दाखल केला आहे. फसवणुकीची कारवाई ठाकरे सरकारने केली. उद्धव ठाकरेंनी अशा पद्धतीने अनिल परब यांचा काटा काढला. फसवणुकीच्या ऑर्डरवर आदित्य ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणून मी आताचे ठाकरे कुटुंब माफिया आहे, असे मी म्हणतो.