मितावली येथिल घटना सहा महीने दुष्काळात पिक फळाला येत असतांना …निसर्गाने हिरावला घास.
धानोरा – दि २ रोजी दुपारी आलेल्या वादळी तडाख्यात खराब झालेल्या सहा महीन्याच्या पाच एकरावरील केळी पिकावर मितावली येथिल शेतक-याने चक्क रोटर फिरवुन दिले.यामुळे वादळी तडाख्याला आठवडा उलटतोय तोपर्यंत शेतक-यांच्या संकंटात घट झालेली दिसत नाही आहे.यामुळे ऐन ४५ अंशावर केळी जगवली होती,लाखो रुपये खर्च करुनही उपयोग शुन्य झाला.
चोपडा तालुक्यात १४ गावांना दि २ रोजी वादळी तडाखा बसल्याने हजारो हेक्टरावरील केळी,अन्य पिके नेस्तानाभुत झालीत.यात फटका बसलेल्या शेतक-यांचे घाव अजुनही ताजे आहे.दिड वर्षात धानोरा शिवारातील गावांना तब्बल तीन वेळा गारपिट व वादळाचा तडाखा बसला असल्याने शेतकरी सुन्न झालेले आहे.यातच मितावली येथिल शेतकरी कैलास परबत पाटील यांनी पाच एकरवर सात हजार टिश्यु कल्चर चे रोप लावले होते.यात त्यांनी खते,रासायनिक प्रक्रीया,ठिंबक,मोलमजुरी,इतर खर्च करुन वाढवायला सुरुवात केली.यातच ऐन उन्हाळ्यात विहीरी,कुपनलिका आटल्यानंतर अतोनात कष्ट करुन कशीतरी केळी वाचवण्याचा प्रयत्न केला होता.यातच दि २ रोजी दुपारुन आलेल्या भयानक वादळात त्यांची संपूर्ण सात हजार खोड हे खराब झाले.यामुळे आता पुढील प्रक्रीया बंद करुन दि ७ रोजी सकाळी कैलास पाटील यांनी संपूर्ण शेतात थेट रोटर फिरवुन वाढवलेले केळी खोड नाईलाजास्तव खल्लास करुन टाकले.यात त्यांनी लाखो रुपये खर्च करुन पिक वाढवले होते.पूढे भविष्यात चांगले उत्पन्न घेऊन स्वप्न रंगवत असतांना अचानक पाणी फेरले गेले.यामुळे वादळी फटका बसलेल्या अनेक शेतक-यांचे घाव अजुनही जात नाही आहे.यात काही शेतकरी दोन-तीन दिवस अन्नाचा कणही घेतलेला नसल्याच्या घटना समोर आल्यात.