बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरे यांना जामीन देण्यात आला होता. मात्र, यानतंर ते न्यायालयात सतत गैरहजर राहिल्याने परळी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईमध्ये मनसे अध्यक्ष मुंबईमध्ये राज ठाकरे यांना ऑक्टोबर 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर सपूर्ण राज्यभर या घटनेचे पडसाद उमटले होते. राज यांच्या अटकेविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड तसेच बसवर दगडफेक झाली होती. तर असाच प्रकार परळीमध्ये सुद्धा घडला होता. यात धर्मापुरी पॉईंट इथेही एसटी बसवर दगडफेक झाल्याने एसटीचे नुकसान झाले होते. तर यानंतर जमावबंदीचा आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणं आणि चिथावणीखोर वक्तव्य करणे या आरोपात राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलीस ठाण्याने या प्रकरणात तपास पूर्ण करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.