मुंबई : राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत. पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय ? असा प्रश्न उपस्थित केला.
तसेच आमदारांना खासदारांना पेन्शन दिली जाते. ती पहिली बंद केली पाहिजे. उपकार करता का साल्यांनो. देशातील सर्व
देशातील सर्व माननीय आमदार, माननीय खासदार लोकांचं काम करायचं ना मग पेन्शन कशाला हवी. करा काम. आताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदाराने घर मागितलं होतं ? मुख्यमंत्र्यांना काय झालं, की त्यांना त्यात कोणता कट दिसला ? असा खोचक सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
आमदारांना घर द्यावं आणि त्यांचं फार्महाऊस ताब्यात घ्यावं
जे पूर्वापार झोपडपट्टीमध्ये आले, चाळीमध्ये आले त्यांना घरे मिळाली पाहिजेत. पोलिसांना घरे मिळाली पाहिजे. साला आमदारांना कसली घरं वाटताय ? हा आमचा राजू, राजू पाटील याने पहिला विरोध केला. आमदारांना घरे देऊ नका म्हणून. मला वाटतं आपण देवाण-घेवाण करावी. आमदारांना घर द्यावं आणि त्यांचं फार्महाऊस ताब्यात घ्यावं. मग आम्हाला काही घेणंदेणं नाही. आमदारांना खासदारांना पेन्शन दिली जाते. ती पहिली बंद केली पाहिजे. उपकार करता का साल्यांनो. देशातील सर्व माननीय आमदार, माननीय खासदार लोकांचं काम करायचं ना मग पेन्शन कशाला हवी. करा काम. आताची परिस्थिती पाहिली तर कोणत्या आमदाराने घर मागितलं होतं ? मुख्यमंत्र्यांना काय झालं, की त्यांना त्यात कोणता कट दिसला ? असा सवाल केला.