मुंबई,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँगेसचे नेते नवाब मलिक सध्या इडीच्या कोठडित असल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन चालू असतानाच भाजपा कडून विधासभेच्या पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहिमही राबवण्यात आली. या सह्यांच्या मोहिमेत सत्ताधारी पक्षातीलच राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्वाक्षरी केली असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.
राष्ट्रवादी आमदारांनी स्वाक्षरी केल्यानंतर पुढे काय झालं
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार पणे घोषणाबाजी करत विरोधक थांबले असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सह्या करण्यास काही आमदारांनी आग्रह धरला सही करते वेळी त्यांना सही कशासाठी आहे हे माहीत नव्हते नंतर ही गोष्ट त्यांना ज्यावेळी समजली की स्वाक्षरी मोहीम नवाब मालिकांच्या राजीनाम्या साठी आहे तेव्हा मात्र त्यांनी डोक्यावर हात मारुन केलेल्या सहीबद्दल ज्या भावना होत्या त्या त्यांनी न बोलताच व्यक्त केल्या.
या अधिवेशनात चर्चेचा विषय झाला आहे तो म्हणजे नवाब मलिक यांचा राजीनामा. विरोधकांनी जोरदार टीका आणि आरोप करत मलिकांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे यासाठी विरोधकांनी विधासभेच्या पायऱ्यांवर सह्यांची मोहिमही राबवण्यात आली.
नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मोहिमेवर त्यांनी सही केली. त्यातच ते वैधानिक पदावर आहेत. त्यांना अशी सही करता येत नाही.
आज विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होईल तेव्हा झिरवळ यांचा या मोहिमेला पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्या त्यांच्या सहीच्या आधारे भाजपकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.