जळगाव : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरूणाने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी पतीविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर वेगळंच प्रकरण उघडकीस आलं आहे. बालविवाह केल्याच्या कारणातून पोलिसांनी पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित मुलीच्या आईसह मावशी, मामा, सासू आणि सासऱ्यांवरही वेगळा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीचे तिच्या मामासह इतर नातेवाईकांनी जामनेर तालुक्यातीलच एका तरुणासोबत ६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेला घेऊन तरुण जळगावात आला आणि याठिकाणी दोघेही शनिपेठ परिसरातील एका भागात भाड्याच्या खोलीत राहात होते.
यादरम्यान तरूणाने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत शिवीगाळ केली. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी ८ फेब्रुवारी रोजी तिच्या आजीकडे इंदौरला जाण्यासाठी निघाली. मात्र या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तिला तिच्या आजीचे घर माहीत नसल्याने ती पोलिसांकडे गेली. तेव्हा सदर मुलगी अल्पवयीन असून घरातून पळून आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
पीडित मुलीची अधिक विचारपूस केल्यानंतर तिने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पीडित मुलीला स्थानिक बाल कल्याण समितीकडे पाठवलं.
हे देखील वाचा :
प्रतीक्षा संपली! मोदी सरकार EPF वर व्याज वाढवणार, या दिवशी होणार घोषणा
..तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य
IRCON मध्ये परीक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, मिळेल 40000 पगार
आयसर-दुचाकीचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच मृत्यू
आज कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ काम पूर्ण करा! नाहीतर तुमचे पैसे बुडतील
याठिकाणी सविस्तर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीला जळगावातील बालकल्याण समितीकडे पाठवलं. तिथेही चौकशी आणि जबाब नोंदवून घेण्यात आले. यावरून पोलिसांनी आरोपी पतीसह त्याचे मामा, पीडित मुलीची आई, मामा, चुलत मावशी, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यावरून आरोपी पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास शनी पेठ पोलीस करत आहेत.