जळगाव । औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. जळगावमधील आकाशवाणी चौकात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पोलीसांनी निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड करून ताब्यात घेतले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कालपासून जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहे. सोमवारी दुपारी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जैन हिल्स येथून कार्यक्रम आटपून राज्यपाल विद्यापीठाकडे दुपारी १ वाजता निघणार होते. याच रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निषेध केला.
हे देखील वाचा :
..तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य
IRCON मध्ये परीक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, मिळेल 40000 पगार
आयसर-दुचाकीचा भीषण अपघात, माय-लेकीचा जागीच मृत्यू
आज कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ काम पूर्ण करा! नाहीतर तुमचे पैसे बुडतील
यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.