मुंबई : राज्य सरकारने घसघशीत पगारवाढ करूनही गुरुवारी एसटी कामगार-कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अडून बसले आहे. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
मागील संप 15 दिवस चालल्यानंतर राज्य सरकारनं ऐतिकासिक 41 टक्के पगारवाढ जाहीर केली. त्यानंतर गुरुवारी आझाद मैदानावरील संपकऱ्यांचे नेते सदाशिव खोत व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. परंतु शेकडो संपकरी मैदानावर ठिय्या देऊन आहेत. तर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देऊन कामावर हजर होण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली होती. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर काही एसटी कर्मचारी अजूनही संपावर आहेत. त्यामुळे हट्ट करून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले?
पगारवाढीचा प्रस्ताव कामगारांच्या हीतासाठीच
12 ते 13 हजार कर्मचारी कामावर परतले
कोरोनामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट
लोकांना वेठीस धरू नका, लोक दुसऱ्या पर्यायाकडे वळत आहेत
तंटपुंडे पगार असणाऱ्यांचे पगार वाढवले
दर महिन्याला 10 तारखेच्या आधी पगाराची हमी
विलीनीकरणाबाबत समितीचा अहवाल मान्य करणार
बाकीच्या राज्यांच्या बरोबरीनं एसटी कर्मचाऱ्यांना पगार
काही कामगार विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
हट्ट करून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
परबांच्या आवाहनला सकारात्मक प्रतिसाद मिळणार?
एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत. आम्ही गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, मात्र सदावर्ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी कोर्टात लढावं, आमचं काही म्हणणं नाही असंही परब म्हणालेत. न्यायलयीन प्रक्रियेचा वेळ सदावर्ते कमी करु शकतात का? असा सवालही परबांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं असं आवाहन अनिल परबांनी केलंय. त्यामुळे आता परबांच्या आवाहनाला एसटी कर्मचारी किती प्रतिसाद देतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.