नवी दिल्ली : देशभरात मागील गेल्या काही महिन्यात खाद्य तेलांच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहे. यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेले आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या किंमती आणखी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात असून आता सरकारने रविवारी खाद्यतेलांच्या व्यापाऱ्यांवर 31 मार्चपर्यंत साठा किंवा साठवण मर्यादा घातली. केंद्राच्या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किमती कमी होतील, परिणामी देशभरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी शक्यता आहे.
विशिष्ट अन्नपदार्थांबाबत परवाना देण्याची आवश्यकता, साठवणूक मर्यादा आणि संचलन निर्बंध हटवण्यासंबंधी (सुधारणा) आदेश, २०२१ तात्काळ प्रभावाने जारी करण्यात आला आहे. NCDEX मध्ये मोहरीचे तेल आणि तेलबियांसंबंधी वायदे बाजार (फ्युचर ट्रेडिंग) ८ ऑक्टोबर २०२१ पासून स्थगित करण्यात आले आहेत. याबाबत केंद्र सरकारने आदेश जारी केला असून सर्व राज्यांना तो सामायिक करण्यात आला आहे. या आदेशानुसार, सर्व खाद्यतेले आणि तेलबियांची साठवणूक मर्यादा संबंधित राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासन पुढील अपवाद वगळता राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या उपलब्ध साठा आणि वापर याच्या आधारावर ठरवेल.
निर्यातदार, रिफायनर, मिलर, एक्स्ट्रॅक्टर, घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेता किंवा डीलर असून परराष्ट्र व्यापार महासंचालकांनी जारी केलेला आयातदार-निर्यातदार कोड क्रमांक त्यांच्याकडे असेल, तर असे निर्यातदार निर्यातीसाठी राखीव साठ्याच्या प्रमाणात निर्यातीसाठी असलेला खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठ्याचा संपूर्ण किंवा काही भाग सिद्ध करू शकतात
आयातदार, रिफायनर, मिलर, एक्स्ट्रॅक्टर, घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेता किंवा डीलर, जर असा आयातदार आयातीतून मिळवलेला खाद्यतेल आणि तेलबियां संदर्भात साठ्याचा काही भाग सिद्ध करू शकतो. जर संबंधित कायदेशीर संस्थांकडे असलेला साठा विहित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्यांनी तो अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर (https://evegoils.nic.in/EOSP/login) घोषित करावा आणि प्राधिकरणाद्वारे जारी अधिसूचनेच्या ३० दिवसांच्या आत संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने निर्धारित केलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत आणावास असे आवाहन करण्यात आले आहे.