पाचोरा, (किशोर रायसाकडा)- ‘पीआरसी’ दौऱ्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक भुर्दंडाचा भार पडत असल्याची जोरदार चर्चा असून तालुक्यातील शिक्षकांकडून प्रत्येकी 500 रुपये तर ग्रामसेवकाना 10000 रुपये जमा करण्याचे फर्मान असल्याचे दबक्या आवाजात बोललं जात असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं दिसून येतं आहे.
पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौरा सुरु झाला असून यात दौऱ्या साठी शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचार्याकडून स्वागताच्या नावाखली आर्थिक वसूली करने सुरु झाले आहे.विशेष म्हणजे शिक्षण विभागातील शिक्षकांनी प्रत्येकि अर्थ सहाय्य म्हणून सामुहिक पैसे जमा करावे असे तोंडी आदेश जिल्ह्यातील काही गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखाना दिले असल्याचे एका शिक्षकाने नावं न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
त् पाचोरा तालुक्यातील केंद्र प्रमुखाना तालुक्यातील प्रत्येकि शिक्षका कडून 500 रुपये जमा करण्याचे तोंडी फर्मान निघाल्याने कलेक्शन करने देखील सुरु झाले आहे हा पैसा कुणाच्या खिशात जाणार?यामुळे नाहक या कर्मचाऱ्यांवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
काय आहे ‘पीआरसी’ समिती….
महाराष्ट्र विधानसभा नियमालीतिल नियम 239 मधील नियमावली ही समिति दर वर्षी गठित केली जाते यात मंडळातील सदस्यांचा देखील समावेश असतो. समिति येण्यापासून ते आढावा घेऊन जाई पर्यंत जिल्हा परिषद संलग्न सर्व अधिकाऱ्यांना टेंनशनच असते.जळगाव जिल्ह्यातील या समितीचा दिनांक 27,28 व 29 सेप्टेंबर रोजी आसा तीन दिवसांचा दौरा आहे.
चर्चेला उधाण ; कर्मचारी मात्र नाराज…
या समितीच्या स्वागत व प्रोटोकॉल पुर्ण करण्याकामी केंद्र प्रमुखा कडून पाचोरा तालुक्यातील प्रत्येकि शिक्षक यानी 500 रुपये तर ग्रामसेवक 10000 रुपये असे आदेश शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखाना दिल्याचे कळते. विभाग निहाय आपाआपल्या अधिनस्त कर्मचार्यांकडून निरोप पाठउन पैशाची जमवा जमव सुरु झाले आहे.वर्गनी जमा केलेली रक्कम रुपये समिति साठी की परस्पर जमा करणारेचं डल्ला मारतील अशी देखील दबक्या आवाजात चर्चा आहे.मुळात अशा प्रकारची वर्गणी जमा करून कर्मचाऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे याची चौकशी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे तरी याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई होईल का?तसेच असेल अनधिकृत वर्गणी जमा करणे थांबेल का अशीच मागणी होतांना दिसत आहे.