मुंबई : राज्याच्या शिक्षक विभागात तब्बल 2062 जागांसाठी भरती असून त्यासाठी शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या भरतीच्या प्रक्रियेबाबतचं एक ट्विट गायकवाड यांनी केलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”
दरम्यान, राज्यात एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार यांचा समावेश आहे. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.