राज्यासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गाने डोकं वर काढलं असून दिवसेंदिवस कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना महाराष्ट्र पोलीस विभागानं
समजूतदार नागरिकांचा ‘ट्रॅव्हल प्लॅन’ ट्विट करून सध्याच्या परिस्थितीत घर हेच सर्वोत्तम स्थळ आहे.घरातच रहा…सुरक्षित राहा… असा संदेश दिला आहे.
राज्य शासनाने कडक निर्बंध लावून देखील नागरिक विनाकारण बाहेर फिरतांनाचे चित्र सर्वत्र असतांना निर्बंध अधिक कडक करण्याचे सरकारनं जाहीर केलं आहे.कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आले आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने राज्यात ऑक्सिजन, बेड्स, व्हन्टीलिटर, रिमेडेसीवर चा प्रचंड तुटवडा भासत असून आरोग्य यंत्रनेवर प्रचंड ताण पडत असतांना नागरिकांनी काळजी घेण्याची हीच वेळ असून घरात रहा, सुरक्षित रहा हा कोरोना पासून वाचण्यासाठी सुरक्षित मार्ग असल्यानेच महाराष्ट्रात पोलीस विभागानं समजूतदार नागरिकांचा ‘ट्रॅव्हल प्लॅन’ सध्याच्या परिस्थितीत घर हेच सर्वोत्तम स्थळ असल्याचं सांगत नागरिकांना घरात राहण्यासाठी आवाहन या माध्यमातून केलेलं आहे.
#StayHome