मुंबई,- गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात ‘होम कॉरंटाईन’ होते असं आम्ही कधीच सांगितलं नाही. मुंबईत होम क्वारंटाइन होते हे स्पष्ट केलं होतं. डिस्चार्ज झाल्यानंतर खासगी विमानाने मुंबईला आल्यानंतर शासकीय निवासस्थानी २७ तारखेपर्यंत कोणतीही हालचाल नव्हती असा खुलासा कॅबिनेट मंत्री ना. नवाब मलिक यांनी केला आहे.
आघाडी सरकारचे आमदार फोडता येत नसल्याने भाजप कडून केंद्राचा वापर करुन सरकार बदलण्याचे प्रयत्न होतं असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी यापूर्वीच केला आहे.भाजपनं कितीही भ्रम पसरवीला तरी सरकारला काही फरक पडणार नाही, सरकार स्थिर आहे.















