पाचोरा- नगर पालिका राजकारणातील विरोधकांकडून विकास कामांना विरोध करून तसेच तक्रारींच्या माध्यमातून स्थगिती आणून विकास कामात अडथळा निर्माण केला जात आहे व निराधार मुद्द्यांच्या आधारे विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत परंतु जनतेने आम्हाला मोठ्या विश्वासाने विकासासाठी सत्ता दिलेली असल्याने कोणी कितीही विरोध केला व मुख्याधिकार्यांनी काहीही टिपणी दिली तरी आम्ही विकास कामे करणारच व जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावणारच असा निर्धार आ. किशोरअप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पालिकेच्या सभेत बुधवार दि. 31 रोजी राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ व इतर विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या टिपणी च्या आधारे शहरातील मुख्य रस्त्याच्या कामांना विरोध दर्शवला होता त्याबाबतचा खुलासा करण्यासाठी पालिकेतील नगराध्यक्ष दालनात गुरुवार दि.1 रोजी सायंकाळी आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपाध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक राम केसवानी, वाल्मीक पाटील, दत्ता जडे, आनंद पगारे, दादा भाऊ चौधरी, रहेमान तडवी मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते .
यावेळी आमदार किशोर पाटील यांनी विरोधकांकडून विकास कामांबाबत होत असलेल्या तक्रारींचा सविस्तर खुलासा केला रस्त्याच्या कामांवर विरोधक आक्षेप घेत आहेत व जनतेची दिशाभूल करीत आहेत या कामांसाठी पालिके जवळ पैसा नाही परंतु या महत्त्वाच्या रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण व्हावे म्हणून ठेकेदार उधारीने हे काम करत आहे पालिकेत जसे पैसे येतील तसे ठेकेदारास दिले जाणार असल्याने ठेकेदाराचे आभार मानण्याऐवजी विरोधक कामांना विरोध करून विकासात अडथळे आणत आहेत रस्त्याचे टेंडर हे ऑनलाईन आहे ते पालिकेने दिलेले नाही उलट पालिकेने ठेकेदाराशी बोलणी करून किंमत कमी केली आहे गतकाळात 2008मध्ये दिलीप वाघ यांची सत्ता असताना 28 ते 30 ज्यादा दराने टेंडर काढून कामे देण्यात आली आहेत रेल्वे भुयारी मार्गाचे टेंडर 75 लाखांचे असताना ते 2 कोटी 34 लाखापर्यंत गेले आहे हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असे सांगून मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी लक्ष्य केले . जर कामाला विरोध दर्शवणारी टिप्पणी करायची होती तर मग कामाचे टेंडर काढून आठ लाखांचे टी एस का भरले ? मुख्याधिकाऱ्यांच्या टिप्पणीमुळे विरोधकांना कोलीत मिळाल्याने मुख्याधिकार्यांनी विरोधकांची सुपारी घेतली की काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला उपनगराध्यक्ष शरद पाटे यांनी स्पष्ट केले की विरोधक एकीकडे विकास कामांची मागणी करतात आणि दुसरीकडे विरोधही करतात भाजी मार्केट साठी 5 कोटींच्या कर्जाला विरोधक विरोध करतात यात दीड कोटी शासनाचे अनुदान आहे फक्त साडेतीन कोटी पालिकेला भरावे लागणार आहेत .जनतेने विकासासाठी व विश्वासाने आमचे हाती सत्ता सोपवली आहे बहुमत असले तरी आम्ही चुकीचे काम करणार नाहीत परंतु आहे ती विकास कामे करून लोकांचा विश्वास सार्थकी लावू असे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले.