जन आशिर्वाद यात्रेला आजपासून जळगावातून प्रारंभ – खा.संजय राऊत यांची पत्रपरिषदेत माहिती
जळगाव – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आज दि. 18 जुलै पासून जन आशिर्वाद यात्राचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेदरम्यान आदित्य ठाकरे जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक, नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणी नागरिकांना भेट देणार आहेत.त्याचा प्रारंभ जळगावातून होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली .
युवासेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूकीचे मोर्चे बांधणी करिता राज्यात जनआशिर्वाद यात्रा करीत आहे. त्यांच्या राजकीय जीवनात प्रथमच ते राज्यात जन आशिर्वाद यात्रा काढत असून या यात्रेची सुरुवात त्यांनी जळगावातून करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातील मतदारांचे प्रेम शिवसेनच्या पाठीशी कायम राहिले आहे. यामुळेच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनआशिर्वाद यात्रा जळगावातून प्रारंभ करणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची माहिती खा.संजय राऊत यांनी यावेळी दिली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना खा. राऊत म्हणाले की, आगामी विधानभा निवडणूकीत दोन्ही पत्र समसमान जागा लढतील. जळगांव व मुक्ताईनगरच्या जागांबाबत विचारले असता पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय होईल असे सांगितले.
या वेळी राज्यमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, महानगर अध्यक्ष शरद तायडेआदी उपस्थित होते. दौरा यशस्वी करा – संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी बुधवारी दौर्याबाबत संपूर्ण नियोजन सांगितले. जनतेच्या विश्वासाला साथ देऊन दौरा यशस्वी करा, असे आवाहन त्यांनी केले . राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती झाली असून सत्तेचे समान वाटप होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या रूपाने एक उमदा चेहरा राज्याला मिळाला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.