अमळनेर,(प्रतिनिधी)- जळगांव लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार दिल्लीला मोठ्या मताधिक्याने पाठवणार असल्याचा निर्धार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी केला असल्याचं अमळनेर येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा दिनांक 21 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे मदत व पुनर्विकास मंत्री मा. अनिलदादा पाटील, जयश्रीताई पाटील, अशोक पाटील, व्ही. आर. आप्पा, भिकेश पाटील, भागवत पाटील, मोहन सातपुते, योगेश मुंदडा, डॉ. अपर्णाताई मूठे, मुख्तार खाटीक, प्रथमेश पवार, प्रदीप अग्रवाल, लालचंद सैनानी, यशवंत बैसाने, सत्तार तेली, विजय राजपूत, संजय पाटील, डॉ. अशोक पाटील, ऋषभ पारख आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.










