मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५०% नवे चेहरे?
जळगाव – सतराव्या लोकसभेच्या मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५०% नवे चेहरे असतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.त्यामुळे दुसऱ्या टर्म मध्ये देखील चांगल्या मताधिक्याने निवडून आलेल्या विकासाभिमुख असलेल्या रावेर लोकसभा मतदार संघातील खा.रक्षाताई खडसे यांना संधी मिळणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
गेल्या पाच वर्षाच्या मोदी सरकारच्या काळात खा.रक्षाताई खडसे यांनी चांगली कामगिरी बजावली आहे.गेल्यावेळेस राजकारणात नवीन असताना देखील लोकसभा मतदारसंघात चांगली पकड मिळविण्यात यश मिळवले आहे.केंद्र शासनाच्या अनेक योजना रावेर मतदार संघात यशस्वी पने राबविल्याने यावेळी देखील जनतेने भरगोस मतांनी रक्षाताईंना निवडून दिले आहे.मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ५०% नवे चेहरे असतील असे सूत्रांचे म्हणणे आहे त्यामुळे रक्षाताई खडसे यांना नव्या मंत्री मंडळात संधी मिळाल्यास जळगाव जिल्ह्यासह खान्देशचा विकासाला गती येईल.
नाथाभाऊंना न्याय पण मिळेल…
विविध आरोपांमुळे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना मंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर ना मंत्रिमंडळ विस्तार झाला ना नाथाभाऊंना मंत्रिमंडळात घेण्याचा विचार …त्यामुळे आजही नाथाभाऊ सारख्या अनुभवी व मातब्बर नेत्यावर अन्याय झाल्याची भावना जळगाव जिल्हावासीयांना मनात आहे.परंतु मोदींच्या विकासदृष्टीला पाहून जनता सातत्याने भाजपवर प्रचंड विश्वास दाखवत आहे.परंतु नाथाभाऊंच्या सुन रक्षाताई यांना नव्या मोदी मंत्री मंडळात संधी दिल्यास नाथाभाऊंवरील अन्याय पण दूर होईल व केंद्रात मंत्रिपद मिळाल्यास रक्षाताई संधीचे सोने करून जळगाव सह खान्देशचा विकास नक्कीच करतील.
सतराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी मावळते गृहमंत्री राजनाथ सिंह यांची निवड केली जाण्याची चर्चा आहे. राजनाथ सिंह यांच्या बरोबरीनेच लोकसभा अध्यक्षपदासाठी मावळते पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेही नाव चर्चेत आहे. अर्थात या दोन नावांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षपदासाठी आश्चर्याचा धक्का देणारे नाव पुढे करू शकतात, असे म्हटले जात आहे. मोदी मंत्रिमंडळात यावेळी पन्नास टक्के नवे चेहरे असतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.