चाळीसगाव – गेल्या वर्षी चाळीसगाव तालुका पाणी फाउंडेशन ने वॉटर कप स्पर्धा २०१९ अंतर्गत प्रथमच सहभागी करून घेतला होता यात ७१ गावांनी सहभाग नोंदवला होता.
यावर्षी पाणी फाऊंडेशन ने समृद्ध गाव योजना सुरू केली. गेल्या वर्षी स्पर्धेत ७६ तालुके होते, यावर्षी मात्र समृद्ध गाव योजनेत ४० तालुक्यांचा समावेश असणार आहे.चाळीसगाव तालुका याला अपवाद नाही.
पाण्याची मोहीम गेल्या वर्षी सुरू झाली, जल संधारणाची कामे गेल्या वर्षी तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये झाल्याने जागरूकता निर्माण झाली होती , त्यालाच जोड म्हणून यंदाच्या पावसाळ्यात तयार केलेल्या भांड्यामध्ये पावसाची पाणी चांगल्या प्रमाणात साठवून ठेवता आले. भू गर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली.
गेल्या वर्षाच्या स्पर्धे नंतर निकाल डोळ्यासमोर दिसत होते आणि सर्वात महत्वाचे यातून तालुक्यातून , गावागावातील जलमित्र, जलदूत व जल योद्धे तयार झाले.
डॉ उज्वल कुमार चव्हाण यांच्या माध्यमातून “जलमित्र परिवारा तर्फे व “पाच पाटील” यांच्या माध्यमातून प्रत्येक पाच पाटलांनी पाच गावांची पाण्यासाठी जबाबदारी घेणे अशी संकल्पना मांडून “मिशन ५०० कोटी लिटर” ची संकल्पना त्यांनी मांडली व त्या दिशेने प्रत्येक १५ दिवसांनंतर पाच पाटलांचे चर्चा सत्र आयोजित करून ते त्यांना मार्गदर्शन करत असतात.प्रत्येक पाच पाटील यांच्या मार्फत एक गाव प्रमुख असेल जो या गावाची जबाबदारी घेईल व गावात नाला खोलीकरण करण्याचे काम करण्यासाठी ३० शेतकरी तयार करतील जे डिझेल साठी पैसे देतील जेणे करून गावात पोकलेन मशीनच्या मार्फत नाला खोलीकरण सारखे कामे करण्यात येतील.तालुक्यात साधारण ३ वर्षा पासून पाणी या विषयावर ते काम करत असून त्यांनी आत्ता पर्यंत धामणगाव, रांजणगाव, शीदवाडी, कळमडू,कुंझर येथे जल संधरणाचे काम राबवले.
गुणवंत सोनवणे यांच्या मार्फत “समुत्कर्ष परिवारामार्फत” मेहूनबारे परिसरातील तीस गावांमध्ये पाण्याविषयी प्रबोधन करण्याचे काम चालू आहे आणि याला शास्वत कामाची जोड द्यावी म्हणून प्रत्येक गावाचे डिजीटल जल आराखडे तयार व्हावेत व प्रत्येक गावातून १ जलदूत तयार करून गाव पाण्यासाठी स्वावलंबी करून गावात पाण्याचे सवर्धन व वितरण करणे.
याला भूजल अभियान ही संकल्पना मांडली व तालुक्याची एक पूर्ण वेळ पाण्यावर काम करणारी टीम असावी जी गावा गावात पाण्या विषयी प्रबोधन करेल व समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत पोहचून जल व्यवस्थापन व प्रबोधनाचे काम करेल.गेल्या ३ वर्षा पासून ते तालुक्यात पाणी या विषयावर काम करत असून गेल्या वर्षी “आभोने तांडा” तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता, त्या सोबत आभोने,राजमाने, कळमडू गावात जल संधरानाचे कामे राबवले.
तालुका दुष्काळ मुक्त हे स्वप्न तालुक्याचे आमदार श्री.मंगेश जी चव्हाण यांच्याही उराशी होते व त्या साठी ते सातत्याने प्रयत्नशील होते.आमदार होण्याआधी त्यांनी चारा छावणी असेल, गावा गावात नाला खोली करणाचे काम त्यांनी राबवले होते,त्यामुळे दुष्काळा बाबतीत तेही व्यथित होते. यातूनच डॉ.उज्ज्वल कुमार चव्हाण व गुणवंत सोनवणे यांनी आमदार श्री.मंगेश चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली व मदतीचे आव्हान केले.यातूनच “शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत मिशन ५०० कोटी लिटर” स्पर्धेची सुरुवात झाली.
आमदारांनी या स्पर्धेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून यात भूजल अभियानाची पाण्यावर पूर्ण वेळ काम करणारी १० सदस्यांची टीम आहे व त्यांच्या मार्फत ११ पोकलेन उपलब्ध करून दिले जाणार आहे.सद्ध्या स्पर्धेत ६० गावांचा समावेश केला असून या संपूर्ण ६० गावांचे २ दिवसीय निवासी प्रशिक्षण आभोने तांडा येथे १५ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे, तरी या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या गावातील ३ ते ५ सदस्यांना घ्यावा.














