भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला गेला ज्यात टीम इंडियाने बाजी मारली. यासह भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
आता टीम इंडियाची नजर मालिका जिंकण्यावर आहे आणि कर्णधार रोहित शर्माला रविवारी इंदूरमध्ये खेळल्या जाणार्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने मालिका जिंकावी अशी इच्छा आहे. मात्र या सामन्यापूर्वी रोहित शर्माला टेन्शन आहे. या सामन्यात रोहितला एक बदल करावा लागेल आणि रोहितसमोर प्रश्न आहे की त्याने कोणाला वगळावे.