नवी दिल्ली : देशातील हवामानात मागच्या काही दिवसांपासून मोठा होत आहे. संपूर्ण हिवाळा कोरडा राहिल्यानंतर आता हवामान बदलले आहे. भारतीय हवामान विभागाने 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. त्यामुळे हवामान पाहून बाहेर जाण्याचा बेत आखणे योग्य ठरेल.
यूपीच्या अनेक भागात पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या मते, 9 ते 11 मार्च या कालावधीत पूर्व भारतात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या उत्तर प्रदेशच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते, त्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे.
हे पण वाचा..
भटक्या बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचललं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
14 मार्चला सरकार कोसळणार ; अजित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी घोषणा.! आता महिलांना मिळणार ST प्रवासात 50 टक्क्यांची सूट
या राज्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान खात्यानुसार, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये 9 ते 13 मार्च दरम्यान पाऊस पडू शकतो. सोबतच गडगडाटी वादळेही येतील, त्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल. उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे, गोवा, किनारी कर्नाटक आणि कोकण भागात तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे झपाट्याने वाढले आहे, त्यामुळे तेथे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.
खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटच्या मते, पश्चिम हिमालयात आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात १२ ते १४ मार्चपर्यंत जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू राहणार आहे. या पावसामुळे झपाट्याने वाढणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी शेतात पिकण्यासाठी तयार उभ्या असलेल्या गहू व इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.