मुंबई : आज राज्याचा २०२३-२४ अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एक मोठा दावा केला त्यामुळे राजाच्या राजकारणात खळबळ उडाली.
काय म्हणले नेमकं अजित पवार?
शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प ( Maharashtra Budget ) म्हणजे शब्दांचे फुलोरे आणि चुनावी जुमला असल्याचे म्हणत सडकून टीका केली आहे. मात्र याच काळात 14 मार्चला सरकार कोसळणार असल्याची भीती असल्याने अर्थसंकल्पात निव्वळ घोषणा करण्यात आल्या आहे असं ते म्हणाले.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी पंचामृत ध्येय सादर करीत अर्थ संकल्प सादर केला आहे. त्यावरून अजित पवार यांनी टीका केली आहे. अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री शब्द बदलून पंचामृत हा शब्द वापरला यावरूनही टीका केली आहे.