नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत नवा ट्विट आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील या कालपासून नॉट रिचेबल आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा दीड तास बाकी असतानाच पाटील या नॉट रिचेबल झाल्याने तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या सर्व प्रकरणावर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले गिरीश महाजन?
शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. यात खळबळजनक काय मला माहीत नाही. माघारीला अवघे दोन तास बाकी आहेत. त्यामुळे उमेदवार कुठे जातो? कुठे राहतो? हा त्यांचा प्रश्न आहे. नॉट रिचेबल आहे आणि खळबळजनक बातमी आहे. पण यात खळबळजनक काहीच नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
अर्ज कुणी मागे घ्यावा, कुणी ठेवावा याच्याशी आमचा काही संबंध नाही. आमचा त्यांच्याशी काहीही संपर्क झालेला नाही. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी उभं राहावं, बसावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कुणालाही एबी फॉर्म दिलेला नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो 3 वाजेपर्यंत जाहीर होईल, असं महाजन यांनी सांगितलं.