मुंबई : ‘हर हर महादेव’ चित्रपटाला केलेल्या विरोधानंतर आणि त्यावरुन झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन दिला. पण जामीनाला २४ तास उलटत नाही तोच आव्हाडांवर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.
राजकीय आकसापोटी किंवा राजकीय हेतू ठेऊन कारवाई होऊ नये, अशी अपेक्षा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे फोनद्वारे व्यक्त केली. त्यावर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात राजकीय आकस अजिबातच नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांना दिलं. एबीपी माझाने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही हजर होते. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर मोठी गर्दी झाली होती. यावेळी गाडीसमोरील माणसांना दूर करताना आव्हाडांनी महिलेला बाजूला सारलं. यावरुनच संबंधित महिलेने आव्हाडांवर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आव्हाडांनी व्यतित होऊन आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. कालपासून याप्रकरणी राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
हे पण वाचा..
तुम्हालाही 1 कोटी रुपये हवेय? मग ‘या’ सरकारी योजनेत फक्त 417 गुंतवा, जाणून घ्या योजनेबाबत
रेल्वे ट्रॅक ओलांडताना बुट निघाला.. तितक्यात लोकल आली, अन्.. पाहा थरार Video
मुलांमध्ये हा आजाराचा झपाट्याने पसरतोय.. संसर्ग घातक असू शकतो ; जाणून घ्या काय आहेत लक्षणे
जिल्हा दूध संघातल्या अपहार प्रकरणी व्यवस्थापकासह चौघांना अटक, खडसेंना धक्का
याप्रकरणीही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होतो, तुमच्यासमोरच हे सगळं घडलं… कृपया राजकीय आकसापोटी अशी कारवाई योग्य नव्हे, अशी नाराजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बोलून दाखवली.