मुंबई,(प्रतिनिधी)- ऐन दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी लात-बुक्के आणि चाकूने वार करून २४ वर्षीय तरुणाची हत्या केली. मृत तरुणाचे नाव सुनील शंकर नायडू असे आहे.
ही घटना सोमवारी दुपारी येथील शिवाजीनगर भागात बिल्डिंग क्रमांक 15 B, नटवर पारेख कंपाउंड जवळ घडली.काचेच्या बाटलीत फटाका फोणाऱ्या 12 वर्षीय मुलाचे नाव आकाश मंडल, त्याच्या भावाचे नाव विकास मंडल (15) आणि 14 वर्षांच्या त्याच्या मित्राचे नाव विकास शिंदे, असे आहे.
प्राप्त माहिती नुसार, दुपारच्या सुमारास एक १२ वर्षांचा मुलगा काचेच्या बाटलीत फटाका फोडत असल्याचे पाहून सुनील नायडूने त्याला रोखले आणि तेथून हकलून दिले.याचा राग आल्याने संबंधित १२ वर्षांचा मुलगा आपल्या एका १५ वर्षांच्या भावाला आणि १४ वर्षांच्या मित्राला घेऊन आला आणि या तिघांनी सुनील नायडूला मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार केले.
यात नायडू गंभीर जखमी झाला, जखमी अवस्थेत स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गंभीर झाल्याने नायडूचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.