मुंबई: शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. मात्र यात मनाजोगे खाते न मिळाल्याने शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत. यावरून विरोधांकडून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या नाराज मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हस्यास्पद आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळे यांनी उडवली आहे. आजकाल नेत्यांचे मोबाईल नॉटरीचेबल येत आहेत. हे सुद्धा हस्यास्पद आहे. नेत्यांचा फोन सदैव रिचेबल असायला हवा. तुमच्याकडे ही काय मोबाईल नॉट रिचेबलवाली पद्धत सुरू झाली आहे, असं मला आजकाल दिल्लीवाले विचारत असतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
हे पण वाचा :
आता ठरलं ! आदित्य ठाकरेंच्या जळगावच्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर
शारिरीक संबंधातून प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराने घेतला ‘हा’ भयानक निर्णय
महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 60000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी
दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज सोने-चांदीच्या किमतीत झाली इतकी मोठी घसरण
आपल्या राज्याला हे हॉटेल पॉलिटिक्स परवडणारे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन हॉटेलमधे बसायचे आणि राज्याला वाऱ्यावर सोडायचे हे आपल्याला परवडणारे नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.