मुंबई : जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर सुमारे तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने उघडीप दिली. मात्र आता राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्याच्या सर्वच भागात पुढील 8 दिवस पाऊस चांगलाच जोर धरणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीसह कोल्हापूर, नाशिक, पुणे सातारा या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार बरसणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागात पावसाचा जोरदार अंदाज असल्याचे सांगण्यात आले.
पुढील पाच दिवस या जिल्ह्यांना यलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे नंदूरबार, जळगाव, नांदेड, नगर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा वाशीम, यवतमाळ.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा..
वनरक्षक विवाहितेने प्रियकराच्या साथीने काढला पतीचा काटा, असा झाला उलगडा
कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? सत्य काय आहे ते जाणून घ्या
नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी.. जाणून घ्या तपशील
ना डोरी ना बिकिनी, यावेळी उर्फी दिसली कपड्यांशिवाय, शरीर केसांनी लपवले
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार
11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही 7-8 ऑगस्टला मुसळधारची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा बरसण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी सोलापूर, यवतमाळ, जालना, धुळे यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.