मुंबई : राज्यात नुकतीच राज्यसभेची निवडणूक पार पडली. यानंतर आता येत्या २० जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीसह भाजपने आपले उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईतून पाठ फिरताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांची तातडीनं बैठक झाली. या बैठकीत विधान परिषदेची रणनीती ठरवण्यात आल्याचे समजते.
राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने आशिष शेलार यांच्या खांद्यावर टाकली होती. तर विधान परिषदेत आघाडी धूळ चारण्यासाठी शेलारांसह गिरीष महाजन व प्रवीण दरेकरांना जबाबदारी टाकण्यात आली आहे. तिन्ही नेते फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
हे पण वाचा :
सर्वसामान्यांना आणखी एक झटका : आता गॅस कनेक्शन घेण्यासाठी मोजावे लागतील इतके रुपये
मान्सूनने घेतला ब्रेक ; येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ भागात विजांचा कडकडाटसह पाऊस
हृदयदायक : पदवीच पाहिलंच वर्ष अन् नियतीने रचला डाव, दोन जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी अंत
राज्यसभा निवडणुकीवेळी निर्णायक ठरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी महाजन यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ठाकूर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाजन याहीवेळी ठाकूरांचं मतं भाजपच्या पारड्यात वळवण्यात यशस्वी ठरणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.